मला खर तर मतदान हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे म्हणुन मतदान करायला आवडते.
पण मतदानाला गेल्यावर मी खरच बुचकळ्यात (!) पडतो कि वाईटातला चांगला कुठला त्याला मी मतदान करत आलोय. सर्व घटना आणि रोजच्या बातम्या बघितल्यावर मला वाटायला लागले कि हे राष्ट्रीय कर्तव्यच आहे का ? कि आपण यांना निवडून देऊन एका पापात सहभागी होतोय.
हे अस पाप दर पाच वर्षांनी करण्यापेक्षा आपण सर्व सुजाण व (सु)शिक्षीत लोक काय करतोय. जर काही वाईट लोक एकत्र येतात व वर्षानुवर्षे एकत्र राहतात तर आपण सुजाण नागरिकांनीही तस करायला काय हरकत आहे ?
तर या लेखाला फक्त वाचुन विसरण्यापेक्षा वा यात जिवतोडून अभिप्राय नोंदवून गप्प बसण्यापेक्षा चला तर आपणही देशाला वाचवायची एक चळवळ सुरु करुया, जेणे करुन पुढील पिढी आपल्या नावे बोटे मोडणार नाही, आपल्याला दोष देणार नाही.
आज प्रत्येक गावात, शहरात अत्रें पासुन बरेच कट्टे सुरु झाले आहेत. आपणही एक “सुजाण कट्टा” सुरु करुया व यात हवामानाच्या गप्पांसोबत पुढील निवडणुकीत कसे उमेदवार निवडून यावेत या संबंधी चर्चाच नाही तर ठोस कृती करुया.
यात सहभागी व्हायची इच्छा असेल तर पुढील महिन्यात एक दिवस एखाद्या मधवर्ती जागी भेटून पुढील दिशा ठरवता येईल.
आहात तयार ?
↧
कृते :- अजय
↧